Skip to main content

मोबाईलच्या व्यसनातून बाहेर कसे पडाल ?

आपण मोबाईलवर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहत असतो, अशा व्हिडिओला मिलियन व्हीव्ज असतात, नक्की आपण काय बघत आहे, अशी कोणती तरी लिंक येते आणि मग त्यावर तुम्ही क्लिक करता पुन्हा त्याला काही व्हिडिओ खालून येतात. स्क्रोल करतात करतात आणि तुम्ही एका ट्रकमध्ये अडकतात बरोबर त्या जाळ्यात अडकतात. 

या सर्व फोटोंची रचना अशी केलेली असते की ज्यामध्ये बरोबर तुम्ही अडकणार आणि त्याच्या नंतर तुम्हाला त्याची नशा होणार. तुम्ही त्या व्यसनात अडकणार अशा व्हिडिओमुळे इतरांचा खूप फायदा होतो मात्र तुम्ही प्रचंड मोठ्या जाळ्यात अडकता. प्रगती तर सोडा, तुम्ही तुमच्या आयुष्यात मागे खेचले जाता.


यावर उपाय काय ?

आता मी तुम्हाला काही सूत्र सांगणार आहे की ज्याच्याने या सगळ्या सोशल मीडियावर च्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा तर नक्की होईल तुमचं नुकसान जे होतंय ते  होणार नाही. काही सूत्र आहे. 



पहिले सूत्र: जे ठरवलंय तेच बघायचं

आधी ठरवायचं काय आपल्याला बघायचं, म्हणजे काय करायचं तुमच्या क्षेत्राबद्दल, तुम्हाला जे नॉलेज पाहिजे त्याबद्दल, व्याख्यानाबद्दल, तुम्हाला जे काही माहिती पाहिजे ते आधीच ठरवा, त्याची लिस्ट तयार करा.आणि त्याचे फोल्डर तयार करा.आणि मग जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा तुम्ही कोणत्या वेळा ठरवल्या असेल त्या वेळेला तेच बघायचं. मनोरंजन असेल काही नॉलेज असेल, जे ठरवलंय तेच बघायचं.

जे नाही बघायचं ते पण ठरवायचं म्हणजे काय सोपे आहे. जे जे गॉसिप आहे, कशा कशात गॉसिप आहे फिल्मी, राजकारण, धर्म, अश्चील व्हिडिओ. हे सगळं, नाही बघायचं


लोकांच्या जीवनातील गॉसिप बघून,ऐकून तुमचं भल होईल असं वाटतं तुम्हाला. कधीच नाही त्याच्यामुळे आपल्याला हे पाळायला लागेल आणि मग काय होईल माहित आहे तुम्हाला जे आपोआप समोर येत ते मुळीच बघायचं नाही ते जाळ टाकलेय तुमच्यासाठी, तो तुम्हाला फसवणार. मला सांगा अस सहज काही होत का , कोणी तरी काही तरी टाकत समोरून. म्हणजे आपल्याला नाही ते बघायचं. जीवनाचा कंट्रोल आपल्या प्रत्येक क्षणाचं कंट्रोल हे आपल्या हातात पाहिजे त्याचे कारण असे मित्रांनो आपण जे बघतो वाचतो ऐकतो तसेच आपण बनतो. आणि हे व्यसन असल्यामुळे काय होत, एक प्रकारचा व्हिडिओ बघितला कि तसे शेकडो व्हिडिओ येत जातात आणि आपण ते बघत जातो, बघत जातो. आणि आपली पूर्ण मानसिकता तशी होते

दुसरा सूत्र : ठरवा किती वेळ द्यायचा 

कितीवेळ बघायचं, दिवसातून जास्तीत जास्त दीड दोन तास, तेही ८० / २० प्रमाण. म्हणजे ८० टक्के कामासंदर्भात बघा. 20% तुम्ही मनोरंजनाचे बघा. सलग ३० मिनिटांहून जास्त पाहू नका. नाहीतर तुमचे डोळे मेंदू पाठ याची वाट लागेल आणि ठरवलेल्या वेळात हे करा. वेळ मिळाला की स्क्रोल स्क्रोल स्क्रोल आणी पुन्हा जाळ्यात अडकाल. म्हणून वेळ ठरवा तेव्हाच व्हिडिओ बघायचे आणि सगळ्यात महत्वाचं- महत्त्वाची कामं संपल्यावरच आणि कुटुंबाला थोडावेळ दिल्यानंतरच हे व्हिडीओ बघा एक दिवस शक्य असेल तर उपवास करा त्या दिवशी कुठलाच व्हिडिओ कुठल्याच सोशल मीडियावर बघू नका आणि रात्री दहानंतर कुठलाच व्हिडिओ पाहू नका.

तिसरे सूत्र : ठरवा तुमची निवड 

हे व्हिडिओ निवडायचे कसे आणि स्वत:वर नियंत्रण कसे ठेवायचे. कोणताही व्हिडिओ निवडताना खालील ३ गोष्टी स्वत:ला आधी विचारा.

१.हे माझ्या उपयोगाच आहे का ?

२.हे गरजेचे आहे का ?

३.हे अर्जेन्ट आह का ?


याची होय असेल तरच ते बघा. दुसरं तुम्हाला आनंदासाठी बघायचं असेल तर खरच आनंदीदाई आहे कि परत आपल्याला पश्चाताप होईल असं काही आहे तेही चेक करा. यातून होत नसेल ना सरळ सरळ लॉक लावा, टाईमर लावा. सुविधा सर्व मध्ये दिलेली आहे


चौथे सूत्र : तुम्ही बघाल त्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट तुम्ही नोंदवा

ते आपल्या आयुष्यात कसे वापरता येतील त्याचा प्लान करा प्रत्यक्ष तसं करा आणि मगच नंतरचा व्हिडीओ बघा 

हे जर ४ सूत्र तुम्ही पाळलेत तर तुम्हाला या सगळ्या टेक्नॉलॉजीचा प्रचंड फायदा होईल आणि नुकसान मात्र होणार नाही तर काय होईल माहितीये तुम्हाला याची सवय लागेल व्यसन लागेल आणि त्या ट्रकमध्ये तुम्ही अडकाल.

तुम्हाला माहिती मित्र-मैत्रिणींना सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कामावर असल्यासारखे असते तर तुम्ही त्याच्यावर लागलेले राहतात आणि कोणीतरी पैसे कमवत राहतं असा स्वतःचा उपयोग होऊ नका देऊ आणि आयुष्यात सर्वात महत्वाचे असते वेळ कधीच परत मिळत नाही पैसे देऊन सुद्धा मिळत नाही. अशी वाया जाऊ नका. 


----------------------------------------------------------
संदर्भ : सादर माहिती हि वेबसाईट, इंटरनेट, गुगल जेमिनीमधून घेण्यात आली असून सर्व फोटो हे freepik या वेबसाईट वरून वापरले आहे. माहितीमध्ये काही बदल असू शकतो. 
लेखक, प्रकाशक या लेखातील माहितीशी सहमत असतील असे नाही.   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नवीन स्मार्टफोन खरेदीसाठी मार्गदर्शक टिप्स जाणून घ्या

 आज आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच वेळा आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक नुकसानही होऊ शकतं. म्हणूनच, स्मार्टफोन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि कधी खरेदी करावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. बाजारात स्मार्टफोन घेण्यासाठी गेल्यावर काही गोष्टींची काळजी घेतल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळता येते. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची व्यवस्थित तपासणी करणे गरजेचे असते, कारण त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून, स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती असावी आणि तो कधी खरेदी करावा, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फोटो काढणे, बँकेचे व्यवहार करणे, सोशल मीडियावर कनेक्टेड राहणे, ऑफिसचे काम करणे आणि मनोरंजन करणे हे सर्व काही आता एकाच डिव्हाइसमध्ये शक्य झाले आहे. यावरून स्मार्ट...

डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत - पासवर्ड

आजकाल आपले बरेचसे आयुष्य ऑनलाइन जगात व्यतीत होते. आपले बँक खाते, सोशल मीडिया, ईमेल आणि इतर अनेक महत्त्वाचे अकाउंट्स आपण इंटरनेटच्या माध्यमातून वापरतो. या डिजिटल जगात आपली माहिती सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती आपल्या पासवर्डची! कमजोर पासवर्ड तुमच्या अकाउंट्सला हॅकर्ससाठी खुले निमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच, मजबूत पासवर्ड कसा बनवायचा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा पासवर्ड तुमच्या डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत आहे. कमजोर पासवर्ड हॅकिंगसाठी आमंत्रण ठरू शकतो. आजच तुमच्या सर्व महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड तपासा आणि त्यांना अधिक मजबूत करा. मजबूत पासवर्ड म्हणजे काय? मजबूत पासवर्ड म्हणजे असा संकेतशब्द जो सहजपणे ओळखता येत नाही किंवा हॅक करता येत नाही. तो अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा योग्य मेळ असतो आणि तो वैयक्तिक माहितीवर आधारित नसतो. मजबूत पासवर्ड बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स: लांबी महत्त्वाची: तुमचा पासवर्ड शक्यतो किमान ८ अक्षरांपेक्षा जास्त लांबीचा असावा. जास्त लांब पासवर्ड क्रॅक करणे अधिक कठीण असते. अक्षरांचे मिश्रण: पासवर्ड...

किशोरवयीन विचार म्हणजे काय?

दुसऱ्यासाठी जगणे यातच खरे जगणे आहे. माणसाने आयुष्यामध्ये कोणातरीसाठी जगावे.  प्रत्येक वेळी देव आपली काळजी करत असतो. तो देव आपल्या कामात प्रत्येक क्षणाला धावून येत असतो फक्त ते आपण ओळखले पाहिजे सतत देवाचे नामस्मरण केले पाहिजे, जे आपण हिंदी, मराठी गाणी म्हणतो, त्यापेक्षा देवाचे नामस्मरण केले पाहिजे.गाणी म्हणणे हे माणसाला आवडते पण देवाचे नाव घेयचे म्हटले की लाज वाटते. ही आजच्या माणसाची परिस्थिती आहे. माणसाने ओळखले पाहिजे की आपल्याला ही शिक्षा मिळाली आहे की ते चांगल्यासाठी होते आहे जर शिक्षा असेल तर आपण काय केले तेव्हा आपणाला शिक्षा भेटली मिळाली आहे कोणतेही गोष्ट होती ती चांगल्यासाठीच. पण ज्याचे आधी चांगले होत त्यांचे नंतर वाईट होते पण ज्याचे आधी वाईट होत त्याचे नंतर चांगले होते. गुरु कोणाला म्हणावे जो आपणाला घडवतो चांगले शिकवतो चार गोष्टी समजावून सांगतो त्याला गुरू म्हणावे गुरुच्या अनेक व्याख्या आहेत.  माणसाने प्रत्येक गोष्टीवर विचार करावा चांगले काय, वाईट काय हे माणसाला कळले पाहिजे कोणतीही गोष्ट दुकानातून घेताना बारकाईने पहावी दुसरे म्हणजेती गोष्ट किंवा वस्तू किंवा पदार्थ याचा श...