Skip to main content

मनाचे आरोग्य असे जपा

मनाचे आरोग्य असे जपा


मनाचे आरोग्य म्हणजे आपण भावनिक आणि मानसिकदृष्ट्या किती चांगले आहोत.
हे आपल्या विचारांवर, भावनांवर आणि वर्तनावर परिणाम करते. चांगल्या मानसिक आरोग्यासह, आपण जीवनातील आव्हानांना तोंड देऊ शकतो आणि आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगू शकतो.


1 स्वयं संवाद

मनाचं आरोग्य म्हटल की प्रश्न येतो तो मन कुठं असतं? त्याच्यावर उपचार ते कसे करायचे ? काय करायचे? खरं तरं मनाचं आरोग्य छान राखणं खूपच सोपं आहे, त्यासाठी आवश्यक असतो तो संवाद. अखंड संवाद, तोही स्वतःशी, स्वयं संवाद, म्हणूया त्याला. विचार करू लागलो की कळतं आपण स्वतःशीच संवाद साधत नाही. यश मिळालं तर माझं कर्तृत्व, अपयश आलं तर परिस्थिती दोषी ! असं कसं चालेल? चुकांसाठी अन्य कोणालाही जबाबदार धरताना स्वतःशी बोला.. इतरांशी खोटं बोलता ठीक आहे, स्वतःशी तरी खरं बोला म्हणजे अपयशावर यश कसं मिळवायचं, कसं मिळतं हे तुम्हाला सहज समजू लागेल.


2 मूळ शोधा

तणाव, मनस्ताप, संताप या प्रतिक्रिया झाल्या मग प्रश्न येतो की क्रिया सुरू कोठे होते. मूळ कोठे आहे? व्यक्तीत? परिस्थितीत? थोडं अंतरंगात डोकावलं की कळतं की या सर्वाचं मूळ आपल्या मध्येच सापडतं. ते सापडलं की संताप, मनस्ताप क्षणात संपून जातो. एखादा माणूस तुम्हाला आवडतो किंवा एखादा आवडत ही नाही. का आवडत नाही? तर तो तुमच्या स्वार्थाचा (हिताचा) विचार करीत नाही. आता हेच पाहा, त्यानं तुम्हाला शिव्या दिल्या की तुम्ही संतापता, तुमचा त्रास तिथेच सुरू होतो, कारण त्यानं दिलेल्या शिव्या तुम्ही स्वीकारलेल्या असतात.समजा, त्या न स्वीकारता सोडून दिल्या तर? संतापाला जागा राहतेच कोठे? शिव्या देणारा फार तर अस्वस्थ होईल? पण तुम्ही शांत असाल तर त्यालाही शांतताच मिळेल.

3 मातृ देवो भव

तुम्हाला प्रमेश्वराचं दर्शन घ्यायचंय ? त्यासाठी यात्रेला जायला नको की मंदिरात. त्याचं अस्तित्व आहे ते आपल्याच घरात. आई वडिलांकडे पहा. त्यांच्यामुळेच आज मी जो आहे तो आहे परमेश्वराने पूजा करण्यासाठी जिवंत देव दिला तो म्हणजे आई वडील. त्यांना रोज नमस्कार करा, त्याचे आशीर्वाद घ्या. त्यांची सेवा करा. जीवनात तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही.


4 आनंद वाढवा

दुःख वाटल्यानं कमी होत अन आनंद वाटल्यानं तो वाढतो असं म्हणतात खर, पण खरंच तस होत का? बऱ्याच वेळा आनंदात आनंद न वाटता असू या वाटली जाते, मत्सर वाटला जातो आता असं पहा. एखादया मोठ्या विवाह समारंभाला तुम्ही गेलात आनंदाचा प्रसंग. सुग्रास भोजनाचा आणि आनंद वाढविण्याचा प्रसंग. पण होत असं की भोजनाचा स्टॉलवर उभे असताना यजमानाच्या या डामडौलावर टीका सुरू होते काही मंडळी नवरा मुलगा किंवा मुलगी यांच्या चारित्र्यावर बोलू लागता तर काही भ्रष्टाचारावर.. असं असेल तर आनंदा वाढेल कसा? त्यामुळे एक करा, ज्या ठिकाणी जायचं-त्या ठिकाणी किमान आपल्याकडून आनंदात मीठ कालविले जाणार नाही याची काळजी घ्या. इतरांच्या आनंदात मनापासून सहभागी व्हा - तो वाढल्याशिवाय राहणार नाही.


5 सेवेतला आनंद

रस्त्यांवरच्या गर्दीत अचानक काही तरी झालं. धावपळ सुरु झाली. त्यात एक अंध व्यक्ती गोंधळलेल्या अवस्थेत उभी होती. काय करावं? कुठे जावं ? पळावं की थांबावं ! काही कळत नव्हतं तिला. कोणी तरी आधार द्यावा त्या व्यक्तीला कोणीतरी पाहील तिच्याकडे असं वाटतं मला, पण माझ्यातला 'मी मात्र मदतीसाठी झेपावत नव्हता. स्वतःला वाचविण्यात कौतुक ते काय ? त्या व्यक्तीला आधार दिला तर? सेवेच्या संधी क्वचितच मिळतात. घेऊन पहा अन् मग मन शांत होणं म्हणजे काय असतं याचा अनुभव येईल तुम्हाला. तुमच्या पाप-पुण्याच्या हिशेबात सेवा पाप नाशकाचं काम करते हेही लक्षात घ्या. आणि मग माणूस झाल्यासारखं वाटलं तुम्हाला!

6 वर्तमानात रहा.

काहीही केलं तरी मन एकाग्र होत नाही. अभ्यासाला बसलं की कुठल्या तरी कामाची आठवण होते किंवा एखादया आठवणीत मन रेंगाळत, काही वेळा दुःखी होतं. अभ्यास राहतो बाजूला, किती प्रयत्न केले एकांतात बसलो, वेळापत्रक केलं. चहा घेतला, गुटखा खाल्ला किंवा सिगारेट ओढली तरी एकाग्रता नाहीच, काय करावं? खरं तर काहीच करावं लागत नाही. आता जो करायचं आहे तेवढंच करावं. वास्तवातला क्षण उपभोगावा. उद्याची चिंता किंवा कालच्या आठवणी किंवा तासा भरांनंतरचं जेवण त्या वेळी करा. आता अभ्यास करीत असाल तर तोच करा. आता खेळत असाल तर फक्त खेळा. टिळी पाहात असाल तर फक्त टिव्ही पाहा, जेऊ नका. एका वेळी एकच गोष्ट मनमोकळी अनु आनंदानं करा मजा येईल. - प्रारंभी कठीण वाटेल. पण सोप आहे ते Be in present.


7 प्रतिमा संवाद थांबवा

माणूस संवाद करतो म्हणजे काय करतो? बऱ्याच वेळा त्याच्या प्रतिमेशीच तो संवाद असतो. हा माणूस खडूस आहे. तो अति शहाणा आहे. तो भित्रा आहे किंवा त्याला अक्कल नाही. आपल्या मनातल्या प्रतिमाशी आपण बोलत असतो त्याचा परिणामही सरळ आहे. खडूस माणूस खडूस आहे म्हणून संवाद साधला तर तो खडूस पणांचाच अनुभव देतो. एक प्रयोग करून पाहा. खडूस माणसाशी ही अगदी मनापासून चांगला वाला चांगलं बोला. त्याच कौतुक करा किंवा वेगळ्या शब्दांत सांगायचं तर तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करा पाहा हा माणूस खडूब होता का? आपण उगाचच भ्रम करून घेतला, असं तुम्हाला काटायला लागेल. तुमच्या बाबतीतही हाप्रयोग शंगर / मशासी होईल.

  • आपले मन आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
  • आपल्या मनाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
  • चांगल्या मानसिक आरोग्यासह, आपण आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगू शकतो.

लेखक: किशोर कुलकर्णी


-------------------------------------------------------------------------

संदर्भ : सदर माहिती इंटरनेट, गुगल जेमिनीमधून घेण्यात आली असून सर्व फोटो हे freepik या वेबसाईट वरून वापरले आहे. माहितीमध्ये काही बदल असू शकतो. लेखक, प्रकाशक या लेखातील माहितीशी सहमत असतील असे नाही.   

Comments

Popular posts from this blog

नवीन स्मार्टफोन खरेदीसाठी मार्गदर्शक टिप्स जाणून घ्या

 आज आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच वेळा आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक नुकसानही होऊ शकतं. म्हणूनच, स्मार्टफोन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि कधी खरेदी करावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. बाजारात स्मार्टफोन घेण्यासाठी गेल्यावर काही गोष्टींची काळजी घेतल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळता येते. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची व्यवस्थित तपासणी करणे गरजेचे असते, कारण त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून, स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती असावी आणि तो कधी खरेदी करावा, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फोटो काढणे, बँकेचे व्यवहार करणे, सोशल मीडियावर कनेक्टेड राहणे, ऑफिसचे काम करणे आणि मनोरंजन करणे हे सर्व काही आता एकाच डिव्हाइसमध्ये शक्य झाले आहे. यावरून स्मार्ट...

डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत - पासवर्ड

आजकाल आपले बरेचसे आयुष्य ऑनलाइन जगात व्यतीत होते. आपले बँक खाते, सोशल मीडिया, ईमेल आणि इतर अनेक महत्त्वाचे अकाउंट्स आपण इंटरनेटच्या माध्यमातून वापरतो. या डिजिटल जगात आपली माहिती सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती आपल्या पासवर्डची! कमजोर पासवर्ड तुमच्या अकाउंट्सला हॅकर्ससाठी खुले निमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच, मजबूत पासवर्ड कसा बनवायचा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा पासवर्ड तुमच्या डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत आहे. कमजोर पासवर्ड हॅकिंगसाठी आमंत्रण ठरू शकतो. आजच तुमच्या सर्व महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड तपासा आणि त्यांना अधिक मजबूत करा. मजबूत पासवर्ड म्हणजे काय? मजबूत पासवर्ड म्हणजे असा संकेतशब्द जो सहजपणे ओळखता येत नाही किंवा हॅक करता येत नाही. तो अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा योग्य मेळ असतो आणि तो वैयक्तिक माहितीवर आधारित नसतो. मजबूत पासवर्ड बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स: लांबी महत्त्वाची: तुमचा पासवर्ड शक्यतो किमान ८ अक्षरांपेक्षा जास्त लांबीचा असावा. जास्त लांब पासवर्ड क्रॅक करणे अधिक कठीण असते. अक्षरांचे मिश्रण: पासवर्ड...

किशोरवयीन विचार म्हणजे काय?

दुसऱ्यासाठी जगणे यातच खरे जगणे आहे. माणसाने आयुष्यामध्ये कोणातरीसाठी जगावे.  प्रत्येक वेळी देव आपली काळजी करत असतो. तो देव आपल्या कामात प्रत्येक क्षणाला धावून येत असतो फक्त ते आपण ओळखले पाहिजे सतत देवाचे नामस्मरण केले पाहिजे, जे आपण हिंदी, मराठी गाणी म्हणतो, त्यापेक्षा देवाचे नामस्मरण केले पाहिजे.गाणी म्हणणे हे माणसाला आवडते पण देवाचे नाव घेयचे म्हटले की लाज वाटते. ही आजच्या माणसाची परिस्थिती आहे. माणसाने ओळखले पाहिजे की आपल्याला ही शिक्षा मिळाली आहे की ते चांगल्यासाठी होते आहे जर शिक्षा असेल तर आपण काय केले तेव्हा आपणाला शिक्षा भेटली मिळाली आहे कोणतेही गोष्ट होती ती चांगल्यासाठीच. पण ज्याचे आधी चांगले होत त्यांचे नंतर वाईट होते पण ज्याचे आधी वाईट होत त्याचे नंतर चांगले होते. गुरु कोणाला म्हणावे जो आपणाला घडवतो चांगले शिकवतो चार गोष्टी समजावून सांगतो त्याला गुरू म्हणावे गुरुच्या अनेक व्याख्या आहेत.  माणसाने प्रत्येक गोष्टीवर विचार करावा चांगले काय, वाईट काय हे माणसाला कळले पाहिजे कोणतीही गोष्ट दुकानातून घेताना बारकाईने पहावी दुसरे म्हणजेती गोष्ट किंवा वस्तू किंवा पदार्थ याचा श...