Skip to main content

मैत्रीचे नियम

सोशल नेटवर्किंग साईट्सवर जण या मोहजालात अडकताना मैत्रीचं पेव फुटलं आहे. बरेच दिसतात. यामुळे मैत्रीच्या सीमा विस्तारतात आणि विश्व समृद्ध होतं हे खरं असलं, तरी प्रत्येक जण या प्रकारची मैत्री निभावू शकतो असं नाही. कारण या मैत्रीचेही काही नियम आहेत.
रोज एकमेकांना प्रत्यक्ष भेटणारे मित्रही काही पथ्यं पाळतात, त्याचप्रमाणे इथेही काही पथ्यं पाळायलाच हवीत. 

आता परेशचं उदाहरण घेऊ. त्याचं कोणाबरोबर तरी भांडण झालं, पण काही काळानंतर परेशला वाईटही वाटलं. आता आपण फेसबुक वर भांडण झालेल्या मित्राशी चॅट करून हा वाद संपवून टाकू, असा विचार त्याने केला. त्याने फेसबुक अकाउंट उघडलं आणि ज्या व्यक्तीशी वाद झाले होते त्या व्यक्तीशी चॅट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्या व्यक्तीने आपलं अकाउंट ब्लॉक करून टाकलं आहे. या गोष्टी परेशला आणखी धक्का बसला. त्यानंतर तो दिवसभर विचार करत बसला. आपल्याला अनु फ्रेंड करण्याचं समोरच्याचं धाडस कसं झालं. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात सतत येऊ लागले. त्याला संताप आला. 

ही भावना त्याच्या मनात इतकी तीव्र झाली की त्याने फेसबुकचं अकाउंट डिलीट करून टाकलं. एकदा त्याच्या घरी फेसबुकवरून चर्चा सुरू होती. फेसबुकवर कोणी तुला त्रास दिलास तर तू काय करतोस असं कोणी तरी परेशला विचारलं. परेशने वेळ न दवडता सांगितलं की ज्याच्याबरोबर माझं जमत नाही त्याला लगेच ब्लॉक करून टाकतो. मला जी गोष्ट आवडत नाही ती ब्लॉक करणं हा माझा अधिकार आहे. समोरच्या व्यक्तीने परेशला विचारलं, एखाद्याला ब्लॉक करणं हा तुला आपला अधिकार वाटत असेल तर एखाद्याने तुला ब्लॉक केलं म्हणून अकाउंट डिलीट करण्याइतका राग तुला का आला? परेशला आता त्याची चूक लक्षात आली. माणसाला त्याचं आयुष्य जगण्याचा, मित्र निवडण्याचा अधिकार आहे हे त्याला जाणवलं. आपण कोणाशीही जबरदस्तीने मैत्री करू शकत नाही. 

कोणी आपल्याला ब्लॉक केलं असेल किंवा आपल्याशी बोलणं बंद केलं असेल तर त्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काही नाही. हा आपला अपमान समजता कामा नये. दरवाजाला दोन्ही बाजूंनी कड्या लावता येतात हे आपण विसरतो.

Comments

Popular posts from this blog

नवीन वर्ष, नवीन सुरुवात: टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन

नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात. आपले ध्येय गाठण्यासाठी आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन हे दोन खूप प्रभावी साधन आहेत. टू-डू लिस्ट: ही एक अशी यादी आहे ज्यामध्ये आपण आपले सर्व काम , प्रोजेक्ट्स आणि ध्येय लिहून ठेवतो. ही यादी आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास आणि आपले वेळ व्यवस्थापन सुधारण्यास मदत करते. जर्नल लेखन: जर्नल लेखन म्हणजे आपल्या विचारां , भावना आणि अनुभवांना शब्द देणे. हे आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि आपल्या मानसिक आरोग्याला सुधारण्यास मदत करते.   टू-डू लिस्टसाठी टिपा: दिवसाच्या सुरुवातीला यादी तपासा. छोटे (शॉर्ट टर्म) व दीर्घकालीन (लाँग टर्म) उद्दिष्टांची यादी. रोजच्या महत्त्वाच्या गोष्टींची टू-डू लिस्ट. प्रत्येक कामाचे वर्णन स्पष्ट आणि संक्षिप्त असावे. सर्वात महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि त्यांना वरच्या बाजूला लिहा. आपण जे काम करू शकतो तेच काम यादीत समाविष्ट करा. पूर्ण झालेली कामे काढून टाका आणि नवीन कामे यादीत जोडा. पूर्ण झालेल्या कामांवर चेकमार्क करा ( ✅...

डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत - पासवर्ड

आजकाल आपले बरेचसे आयुष्य ऑनलाइन जगात व्यतीत होते. आपले बँक खाते, सोशल मीडिया, ईमेल आणि इतर अनेक महत्त्वाचे अकाउंट्स आपण इंटरनेटच्या माध्यमातून वापरतो. या डिजिटल जगात आपली माहिती सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती आपल्या पासवर्डची! कमजोर पासवर्ड तुमच्या अकाउंट्सला हॅकर्ससाठी खुले निमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच, मजबूत पासवर्ड कसा बनवायचा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा पासवर्ड तुमच्या डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत आहे. कमजोर पासवर्ड हॅकिंगसाठी आमंत्रण ठरू शकतो. आजच तुमच्या सर्व महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड तपासा आणि त्यांना अधिक मजबूत करा. मजबूत पासवर्ड म्हणजे काय? मजबूत पासवर्ड म्हणजे असा संकेतशब्द जो सहजपणे ओळखता येत नाही किंवा हॅक करता येत नाही. तो अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा योग्य मेळ असतो आणि तो वैयक्तिक माहितीवर आधारित नसतो. मजबूत पासवर्ड बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स: लांबी महत्त्वाची: तुमचा पासवर्ड शक्यतो किमान ८ अक्षरांपेक्षा जास्त लांबीचा असावा. जास्त लांब पासवर्ड क्रॅक करणे अधिक कठीण असते. अक्षरांचे मिश्रण: पासवर्ड...

नवीन स्मार्टफोन खरेदीसाठी मार्गदर्शक टिप्स जाणून घ्या

 आज आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच वेळा आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक नुकसानही होऊ शकतं. म्हणूनच, स्मार्टफोन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि कधी खरेदी करावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. बाजारात स्मार्टफोन घेण्यासाठी गेल्यावर काही गोष्टींची काळजी घेतल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळता येते. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची व्यवस्थित तपासणी करणे गरजेचे असते, कारण त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून, स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती असावी आणि तो कधी खरेदी करावा, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फोटो काढणे, बँकेचे व्यवहार करणे, सोशल मीडियावर कनेक्टेड राहणे, ऑफिसचे काम करणे आणि मनोरंजन करणे हे सर्व काही आता एकाच डिव्हाइसमध्ये शक्य झाले आहे. यावरून स्मार्ट...